देशासह राज्यातील महीला आणि मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र सरकार तसेंच राज्य सरकारद्वारे अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात. अशीच एक योजना , ज्या बद्दल आजच्या या लेखात आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे, ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ (Majhi Kanya Bhagyashree Yojana). या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार द्वारे पात्र मुलींना जन्मानंतर ५०,०००/- रुपये देते.
माझी कन्या भाग्यश्री योजना म्हणजे काय ?
एप्रिल २०१६ पासून महाराष्ट्र शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ सुरू केली होती. मुलींचा जन्मदर काढण्याकरिता यासोबतच विविध सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे.
ज्या कुटुंबात दोन मुली आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीसाठी सुकन्या योजना कायम ठेवून त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी १८ वर्षे वयाची होईपर्यंत लाभ घेता येतो.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे.
योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाने बँकेत संयुक्त खाते उघडले जाते. यावर एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि पाच हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट देखील उपलब्ध आहे.
मुलीच्या जन्मानंतर पालकांना नसबंदी करून घ्यायची असेल तर त्यांना ५०,०००/- रुपये मिळतात. त्याचबरोबर दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली तर दोन्ही मुलींच्या नावावर २०-२५ हजार रुपये दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मिळालेले पैसे हे मुलीच्या शिक्षणासाठी वापरता येतात.
माझी कन्या भाग्यश्री योजनेची मुख्य उद्दिष्टे :
देशातील आणि राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे.
मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तसेंच खात्री देणे.
मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे तसेंच त्यांच्या समान दर्जा आणि शैक्षणिक प्रोत्साहन देण्याकरिता समाजात कायमस्वरूपी सामुहिक चळवळ निर्माण करणे.
सामाजिक बदलाचे प्रमुख घटक म्हणून पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक समित्या व स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय, महिला मंडळे, महिला बचत गट, व युवक मंडळ यांचा सहभाग घेणे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
आधार कार्ड
आई किंवा मुलीचे बँकपासबुक
मोबाईल फोन नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
रहिवासी पत्ता पुरावा
उत्पन्नाचा दाखला
हे लक्षात घ्या :-
(तिसरे अपत्य असले तरी, या योजनेंतर्गत फक्त दोन मुलींच्याच नावाने लाभ घेता येईल.)
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया तशी फार सोप्पी आहे. सर्वप्रथम तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करावी लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
यानंतर तुम्हाला एक फॉर्म डाउनलोड करावा लागेल. तो फॉर्म नीट वाचून अचूक भरावा लागेल. फॉर्म मध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास तुमचा अर्ज रद्द केला जाईल. फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेली सर्व कागदपत्रे महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करणे आवश्यक असेल.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि अटी !
अर्जदार मुलीचे आईवडिल हे महाराष्ट्र राज्यातील रहीवासी असणे आवश्यक आहे.
‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र रेषेवरील एपीएल पांढरे रेशन कार्डधारक दोन मुलींना लागू केली जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मुलगी जन्म नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या असतील, तर या दोन्ही मुली प्रकार दोनचे लाभार्थी प्रमाणे योजनेस पात्र ठरु शकतात.
बालगृहातील अनाथ मुलींसाठी देखील ही योजना लागू केली जाते.
एखाद्या परिवाराने अनाथ मुलगी दत्तक घेतली असेल, तर त्या मुलीला प्रथम मुलगी मानून या योजनेत सहभागी होता येईल.
माझी कन्या भाग्यश्री योजनेची कार्यपध्दती :
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत, लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीच्या पालकांनी, मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामीण आणि नागरी क्षेत्रातील संबंधीत स्थानिक स्वराज्य
संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र–अ० किंवा -ब० मध्ये (जे लागू असेल ते) अर्ज सादर करावे लागतील.
त्या अर्जासोबतच उपरोक्त नियम आणि अटी नुसार नमूद दस्तऐवज सादर करावेत.
योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज, राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेंच महिला व बाल विकास अधिकारी आणि जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) इत्यादी कार्यालयामध्ये विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अर्जा विषयी अडचणी येत असल्यास, अंगणवाडी सेविकेने संबंधीत लाभार्थ्यांकडून स्वतः अर्ज भरून घ्यावा.
सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्याकडे सादर करणे आवश्यक असेल.
अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांनी, सदर अर्जाची व प्रमाणत्रांची व्यवस्थित तपासणी करुन प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थामधील अनाथ बालकांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद, यांच्याकडे एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करावी.
महिला व बाल विकास अधिकारी (जिल्हा परिषद) यांनी योग्य अर्जाची योग्यती तपासणी करुन यादीस मान्यता द्यावी आणि बँकेस सादर करावी.
बालगृह/शिशुगृह किंवा महिला व बाल विकास विभागातंर्गतच्या इतर निवासी संस्थामधील अनाथ मुलींबाबत लाभ मिळण्याकरिता अर्ज सादर करण्यापुर्वी संबधित बाल कल्याण समिती यांचे मुलगी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र संबधित संस्थानी प्राप्त करून घेऊन अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
1 thought on “माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण माहिती | Mazhi kanya bhagyashree yojana All Information”