अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ माहिती मराठी | Annasaheb Patil Loan Scheme 2024 All Information on Marathi

By Chaughule Mahesh

Published on:

Annasaheb Patil Loan Scheme 2024 All Information on Marathi

राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील युवकांसाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक 27 नोव्हेंबर 1998 रोजी केली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे गरजेचे आहे, कारण या घटकातील बेरोजगार अशा युवकांना रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यसरकारने 29 ऑगस्ट 1998 महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला व या निर्णयाची अंमलबजावणी करून राज्यामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरु करून त्यामार्फत स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबत माहिती, मार्गदर्शन व आर्थिक मदद करण्यात येते.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे?

महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी वर्ष 1998 ला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. आर्थिकदृष्टीने मागास घटकांचा विकास करणे, व्यवसायास, स्वंयरोजगारास प्रोत्साहन देणे हा महामंडळाच्या स्थापने मागचा उद्देश आहे. महामंडळाद्वारे  वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I), गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) आणि गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) या योजना राबवल्या जातात. मराठा समाजातील तरूण-तरूण या योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरू करू शकतात, व्यावसायिक वाहन खरेदी करू शकतात. 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) – या योजनेंतर्गत तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. व्याज परतावा कालावधी 5 वर्षापर्यंत व व्याजाचा दर 12 टक्क्यांपर्यंत असेल. महामंडळ लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल + व्याज) अनुदान स्वरुपात अदा करेल. पहिला हफ्ता हा 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवर असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींचे पालन करणे देखील आवश्यक आहे. 

योजनेचा लाभ हा 50 वर्षांपर्यंत वय असलेले पुरूष 55 वर्ष वय असलेल्या महिलांनाच मिळेल. तसेच, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांच्या आत असणे गरजेचे आहे. यापूर्वी कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला असल्यास या योजनेंतर्गत कर्ज मिळणार नाही. 

गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) – या योजनेंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था,बचत गट, एल.एल.पी.,कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट कर्जासाठी पात्र असतील. या अंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कर्जावरील व्याज परतावा कालावधी 5 वर्षांपर्यंत व व्याजाचा दर 12 टक्क्यांपर्यंत असेल.

या योजनेत देखील वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपये आहे. तसेच, वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता जास्तीत-जास्त 50 तर महिलांकरीता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल. परंतू वयाची अट कृषी व पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना व कंपनी कायदा 2013 अंतर्गत स्थापना केलेल्या एफ.पी.ओ. व दिव्यांग गटांना लागू असणार नाही.

गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) – या योजनेंतर्गत ज्या प्रकल्पांची किंमत 11 लाख रुपयांपर्यंत आहेत, ते अर्ज करू शकतात. अर्जदारास 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. 10 लाखांपेक्षा अधिक कर्ज हवे असल्यास बँकेचे मंजूरीपत्र व वितरण पुरावा महामंडळाकडे सादर करणे गरजेचे आहे. शेतकरी उत्पादक गट (FPO) या योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतो. तसेच, या कर्जाची परतफेड 7 वर्षांच्या आत करणे गरजेचे असेल. या कर्जाच्या रक्कमेतून घेण्यात आलेली सर्व मालमत्ता महामंडळाच्या नावाने गहाण ठेवण्यात येईल. कर्जासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असे दोन जामीनदार देणे देखील गरजेचे आहे. 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा मुख्य उद्देश हा तरुणांना आर्थिक रूपाने सक्षम बनवणे आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी एक मजबूत पाया उभारणे आहे. या योजनेमुळे तरुणांना आपल्या व्यावसायिक कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळते, तसेच राज्यातील बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यास मदत होते. योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गटांना आत्मनिर्भर बनवणे आणि समाजातील त्यांच्या स्थितीत सुधारणा करणे हे देखील एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेची पात्रता निकष

या योजनेसाठी पात्रता निकष सोपे आणि स्पष्ट आहेत.  

  1. अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असणे आवश्यक आहे.  
  2. अर्जदाराचे वय ५५ वर्षांपर्यंतचे असावे.  
  3. उमेदवाराने यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेच्या अंतर्गत एकाच व्यक्तीला केवळ एकदाच कर्ज मिळू शकते.  
  4. उमेदवाराचे बँक खाते आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.  

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेची वैशिष्ट्ये :-

  1. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत जो व्यवसाय करायचा आहे तो महाराष्ट्र राज्यात करणे गरजेचे आहे.
  2. या योजनेअंतर्गत कृषी किंवा पारंपारिक उद्योग, लघु किंवा मध्यम उद्योग उत्पादनाचे अनेक उद्योग व्यवसाय किंवा विक्री क्षेत्रातील उद्योग किंवा सेवा क्षेत्र यात व्यवसाय करणे अनिवार्य आहे.
  3. या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती सहकर्जदार म्हणून या योजनेत भाग घेऊ शकतात.
  4. अर्जदार व्यक्तींनी त्याची परतफेड केली नाही तर अशा परिस्थितीत व्याज परत केले जाणार नाही.
  5. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडला किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत दहा लाखापर्यंत कर्ज दिले जाईल आणि या व्याजाची परतफेड अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळातर्फे केली जाईल
  6. या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज दिले जाते.
  7. योजनेअंतर्गत ज्या व्यक्तींना शेती संदर्भात व्यवसाय सुरू करायचे त्या अर्जदाराची वय 45 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असावी तरच या योजनेअंतर्गत त्यांना लाभ घेता येईल.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेची कागदपत्रे

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक(bank passbook)
  • सीबील रीपोर्ट(cibil report)
  • व्यवसाय -प्रकल्प चे सदरीकरण
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र(taining certificate)
  • बँक कर्ज मंजुरी प्रमाणपत्र

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
  • गट कर्ज व्याज परतावा योजना
  • गट प्रकल्प कर्ज योजना
  • अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पोल्ट्री फार्म

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी असा करा अर्ज

  • या योजनेंतर्गत कर्ज काढण्यासाठी www.udyog.mahaswayam.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ‘कर्जासाठी अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे. 
  • यानंतर तुम्हाला कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाविषयी विचारले जाईल. Yes वर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता. 
  • पुढे तुम्हाला वैयक्तिक माहिती, निवासी तपशील, कर्ज तपशील इत्यादी माहिती भरावी लागेल. ही माहिती भरताना तुम्हाला नाव, पत्ता, पॅन कार्ड, शिक्षण, मोबाइल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल.
  • कर्ज तपशील पर्यायावर क्लिक केल्यानंतर जेवढे कर्ज हवे आहे ती रक्कम नमूद करावी लागेल. 
  • आता आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, जातीचा दाखला ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. 
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही अर्ज क्रमांकाद्वारे कर्जाची स्थिती देखील तपासू शकता. 
  • याशिवाय, तुम्हाला बँकेकडून कर्ज घेतेवेळी LOI (पात्रता प्रमाणपत्र) सादर करावे लागेल. 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही तरुणांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणारी एक महत्त्वाची योजना आहे. यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळते.

Leave a Comment