लाडकी बहिण योजनेत समोर आलेली महिती | Ladaki Bahin Yojana 2025

By Chaughule Mahesh

Published on:

Ladaki Bahin Yojana 2025: लाडकी बहिण योजनेत समोर आलेली महिती बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार, महिलांचे पैसे परत घेतले जाणार का नाही या संदर्भात आजच्या आर्टिकल मध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार की नाही?

नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र, तोपर्यंत तरी लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांचाच लाभ आपण देणार आहोत”, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना १५०० रुपयांवरून पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास २१०० रुपये वाढीव निधी देऊ अशी घोषणा केली होती.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र, राज्य सरकारने अद्याप लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Ladaki Bahin Yojana महिलांचे पैसे परत घेतले जाणार का?

लाडकी बहीण योजनेत पैसे परत घेण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, या योजनेत जर महिलांनी पैसे परत केले तर ते सरकारी तिजोरीत जमा केले जातील. हे पैसे इतर लोककल्याणकारी योजनांसाठी वापरले जातील.

लाडकी बहीण योजनेत महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेत त्यांचं काय होणार?

याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, आतापर्यंत साडेचार महिलांनी स्वतः हून अर्ज माघारी घेतले आहेत. याव्यतिरिक्त महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. त्यातूनही अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत, अशा महिलांचे पैसे परत घेतले जाणार का?

साडेचार महिला पुढे आल्या आहेत. त्यांनी अर्ज माघारी घेतले आहेत. आम्ही या महिलांचे पैसे परत घेणार नाहीत उलट इतर महिलांनीही पुढे येऊन अर्ज माघारी घ्यावेत. पडताळणीत जर काही त्रुटी आढळल्या तर त्या महिलांना याबाबत माहिती दिली जाईल.

कोणत्या बहि‍णींच्या अर्जाची पडताळणी होणार नाही?

या योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशनधारक महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार नाही. या महिलांचे उत्पन्न आधी १ लाखांपेक्षा कमी असते. ही संख्या दीड कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार नाही.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment