Majhi Ladaki Bahin Yojana New Update: महाराष्ट्र राज्यसरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या काही अटींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना फक्त गरजवंत महिलांना पोहोचावी यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. (Mukhyamantri Mazi Ladki bahin yojana February update)
राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने नवे कठोर निकष तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र, वाढत्या आर्थिक भारामुळे सरकारने नवीन नियम लागू करण्याचा विचार केला आहे. यानुसार, लाभार्थी महिलेची प्राप्तिकर खात्याकडील नोंद तपासली जाणार असून, दरवर्षी ई-केवायसी प्रक्रियेद्वारे उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे.
नवीन नियमात काय बदल करण्यात आला
new rules on ladaki bahin yojana
- अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेतून वगळले जाईल.
- प्राप्तिकर विभागाच्या नोंदींच्या आधारे उत्पन्नाची पडताळणी केली जाईल.
- दरवर्षी लाभार्थ्यांना ई-केवायसी व हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
राज्य सरकारने यापूर्वीच 5 लाख महिलांना या योजनेतून वगळले आहे.
- यामध्ये स्वतः अर्ज मागे घेणाऱ्या महिला तसेच
- संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी यांचा समावेश आहे.
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 6.5 लाख लाभार्थी हे एकाच वेळी ‘नमो शेतकरी’ आणि ‘लाडकी बहीण’ या दोन्ही योजनांचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Ladaki bahin yojana February new rules सविस्तर माहिती
- दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच पुढील लाभदिला जाणार.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे ही अट असली तरी त्याचे उल्लंघन करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून आयकर दाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यातून अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांना यादीतून वगळण्यात येणार आहे.
- अन्य मार्गांनीही एखाद्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना अपात्र करण्यात येणार आहे. या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे.
अशा लाभार्थ्यांची जिल्हास्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाकड्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येईल.
हेही वाचा –
• लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? समोर आले नवीन अपडेट
• महिलांना मिळणारं ७,००० रूपये विमा सखी योजनेअंतर्गत
• लाडक्या बहिणींनो तुम्हाला एकही रुपया जमा झाला नाही; तर लवकर करा हे काम
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |