शेतकरी मित्रांना मिळत आहे मोफत बियाणे; मोबाईलच्या मधमातून करा या पद्धतीने अर्ज | Mofat Biyane Yojana 2025

By Vishal Kamble

Updated on:

MahaDBT Biyane Anudan Yojana 2025: महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेहमीच नवनवीन कार्यक्रम राबवत असते. विविध प्रकारच्या योजना राबवत असते. आणि अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेची आपण आजच्या लेखात माहिती घेणार आहोत. खरीप हंगाम 2025 साठी बियाणे मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

योजनेतून कोणत्या वस्तू पुरवल्या जाणार ?

  • सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या आणि प्रमाणित बियाण्यांची पिशवी ही मोफत देण्यात येणार आहे.
  • तसेच या योजनेत
  • सोयाबीन,
  • तूर,
  • मूग,
  • उडीद,
  • मका,
  • बाजरी,
  • भात
  • अशा महत्त्वाच्या पिकांच्या बियाण्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
हेही वाचा : रेशन धारकांना खुशखबर ! पुढील ३ महिन्यांचे राशन मिळणार एकदाचं, काय आहे शासनाच्या निर्णय | Rashan Card new Updates

योजनेतून शेतकऱ्यांना होणारे फायदे :

  • शेतकऱ्यांवरचा खर्च कमी होईल.
  • मोफत दर्जेदार बियाणे मिळण्यास मदत होणार.
  • वाढते उत्पादन होईल.
  • तसेच खरीप हंगामासाठी अतिशय फायदेशीर ठरणार.

MahaDBT Biyane Anudan Yojana 2025 पात्रता

  • MahaDBT Biyane Anudan Yojana 2024 (महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही.
  • त्याचबरोबर अर्जदार शेतकऱ्याच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्याकडे आपल्या जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • तसेच अर्जदार शेतकऱ्यांकडे शेतीला आवश्यक मुबलक प्रमाणात सिंचन सुविधा असणे आवश्यक आहे.
  • महत्वाचं म्हणजे महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024 अंतर्गत अर्जदार शेतकरी अनुसूचित जाती -जमाती मधील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकरी जर गहू,तांदूळ, कापूस, डाळिंब व ऊस या पिकासाठी अर्ज करत असेल तर अर्ज करताना शेतकरी संबंधित जिल्ह्याचा असणे आवश्यक आहे.

महाडीबीटी बियाणे अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवासी दाखला
  4. उत्पन्नाचा दाखला
  5. जातीचा दाखला
  6. जमिनीचा 7/12 व 8 अ उतारापूर्व समंतीपत्र
हेही वाचा : बांधकाम कामगार योजना आणि त्यांना मिळणारे लाभ | Bandhkam kamgar Yojana 2025

योजनेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत:

  • सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून घ्या. (आपला फार्मर आयडी वापरून लॉगिन करा. )
  • तुमची प्रोफाइल पूर्ण अपडेट आहे का ते बघा.
  • वेबसाईटच्या डाव्या बाजूला “घटकांसाठी अर्ज करा” हे बटण दिसेल यावर क्लिक करा.
  • त्यानंतर “बियाणे वितरण” या विभागामध्ये “बाबी निवडा” वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला विचारण्यात आलेली माहिती भरा जसे की,आपला जिल्हा, तालुका , गाव इत्यादी.
  • आता फार्म आयडी आणि गट नंबर निवडा.
  • “प्रमाणित बियाणे वितरण” हा पर्याय निवडा.
  • पीक प्रकारात “गळीतधान्य” आणि पीक मध्ये “सोयाबीन” निवडा.
  • तुमचे किती क्षेत्र आहे ते हेक्टरमध्ये लिहा. बियाण्याचे वजन किलोंमध्ये आपोआप दिसेल.
  • आता सर्व माहिती भरल्यावर “जतन करा” या बटणावर क्लिक करा.

योजनेच्या महत्वाच्या लिंक्स

महा डिबिटीhttps://mahadbt.maharashtra.gov.in

अंतिम सादरीकरण

  • आता पुन्हामुख्य पानावर परत जा. “अर्ज सादर करा” या बटणावर क्लिक करा. अटी व नियम वाचा आणि मान्य करा. अर्जाचे शुल्क रुपये 23.60 ऑनलाइन भरा.
  • जेव्हा अर्ज आणि पेमेंट पूर्ण होईल, तेव्हा पावती डाउनलोड करून ठेवा.
  • “घटक इतिहास पहा” या ऑप्शन वर तुम्हाला आपल्या भरलेल्या अर्जाची माहिती बघता येईल.
  • या अडचणी तुम्हाला येऊ शकतात, त्यासाठी हे करा.
  • फार्मर आयडी दाखवत नसल्यास पुन्हा प्रयत्न करा किंवा तलाठ्यांकडे जा.
  • फक्त ज्या जमिनीचा गट नंबर फार्मर आयडीत आहे, त्याचसाठी अर्ज करता येतो.
  • सर्व्हर जास्त वेळा व्यस्त असतो, त्यामुळे सकाळी 10 च्या आधी, दुपारी 3 ते 4 मध्ये किंवा रात्री 10 नंतर अर्ज करून पाहावा.

अर्ज करण्याआधी या आवश्यक गोष्टी लक्षात ठेवा.

  • योजनेसाठी अर्ज करण्याकरता पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच (Farmer ID) असणे .
  • जर शेतकऱ्यांकडे हे ओळखपत्र उपलब्ध नसेल तर ते जवळच्या सामान्य सेवा केंद्रामध्ये (CSC) जाऊन ते मिळवू शकतील. किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा मिळवू शकता.
  • योजनेच्या अर्ज प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे “पहिले येणारे, पहिले सेवा घेणारे” ही धोरण राबवली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल लागू होत आहे | Kisan Credit Card New Updates

अर्ज करताना येणाऱ्या समस्या आणि त्यांचे उपाय

काही शेतकऱ्यांना पेमेंट करूनही अर्ज दाखल होत नाही. त्याचे काही कारणे असू शकतात:

  • ➤ फार्मर आयडी चुकीचा असणे किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलल्यामुळे OTP न मिळणे.
  • ➤ पोर्टलवर प्रोफाइल अपूर्ण असणे.
  • ➤ अर्जाच्या वेळी इंटरनेट कनेक्शनची समस्या.
  • ➤ पेमेंट प्रक्रियेत अडचण.

महाडीबीटी पोर्टलवर यशस्वी अर्ज केल्यावर काय?

यशस्वी अर्ज केल्यानंतर तुम्हाला अनुदानासाठी निवड केली जाईल. मग तुम्हाला शासनाकडून प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळेल. या बियाण्याचा वापर करून तुम्ही तुमच्या शेतीची उत्पादकता वाढवू शकता. सरकारकडून बियाण्याचे प्रमाणित वितरण झाल्यामुळे तुम्हाला दर्जेदार बियाणे मिळेल. त्यामुळे पीक चांगले होईल, रोग कमी लागतील, आणि शेतीचा नफा वाढेल.

Leave a Comment