Ration card e-KYC today updates: सरकारचा उद्देश आहे की प्रत्येक गरजू कुटुंबाला सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने शिधा मिळावा. त्यामुळे नागरिकांनी वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आपला हक्क अबाधित ठेवावा. ही प्रक्रिया ऑनलाइन व सहजपणे पूर्ण करता येते, त्यामुळे लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक कागदपत्रांसह ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे.
या अंतिम मुदतीनंतर ज्या कार्डधारकांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण असेल, त्यांना मिळणारे मोफत किंवा अनुदानित धान्य (Free/Subsidized Ration card) बंद केले जाईल, तसेच त्यांचे रेशन कार्ड रद्द (Ration Card Cancellation problem) होण्याचीही शक्यता आहे. सध्या राज्यात ५ लाखांहून अधिक रेशन कार्डधारकांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अनेक भागांमध्ये हीच परिस्थिती असल्याने शेवटची संधी म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
केवायसीसाठी ३० एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत
मागील काही महिन्यांपासून राज्यभरात रेशन कार्डधारकांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. विभागीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही मुदतवाढीची चौथी वेळ आहे आणि यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे, सर्व रेशन कार्डधारकांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन केवायसी प्रक्रिया कशी कराल?
रेशन कार्ड केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. नागरिक आपल्या सोयीनुसार कोणत्याही पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
ऑफलाइन पद्धत (Offline Method): यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानात (Ration Shop) जावे लागेल. तिथे
- रेशन कार्डाची प्रत
- आधार कार्ड (Aadhaar Card) दाखवून,
- बायोमेट्रिक मशीनवर (Biometric Machine) तुमच्या बोटांचे ठसे देऊन पडताळणी (Verification) पूर्ण करावी लागेल.
ऑनलाइन पद्धत (Online Method): घरबसल्या केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर
- ‘मेरा KYC’ (‘Mera KYC’) आणि
- ‘Aadhaar Face RD’ हे दोन मोबाईल ॲप्लिकेशन्स डाउनलोड करावे लागतील.
- ॲप उघडल्यानंतर तुमचे राज्य (उदा. महाराष्ट्र) निवडून तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
- त्यानंतर, ॲपद्वारे तुमच्या चेहऱ्याची ओळख (Face Verification) आधार डेटाच्या आधारे पडताळली जाईल आणि तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
ज्या रेशन कार्डधारकांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन ३० एप्रिलपूर्वी ही प्रक्रिया नक्की पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना मिळणारे धान्य आणि इतर लाभ सुरळीतपणे मिळत राहतील.