vihir anudan yojana 2025 : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच तत्पर असते. आणि याच अनुषंगाने ते प्रत्येक वेळी नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी राबवत असते. आजच्या लेखात आपण शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल आढावा घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो असा की शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी शासनातर्फे 5 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.
या निर्णयाअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सिंचनासाठी विहीर खोदण्याचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारने मनरेगा अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ केलेली आहे.
Table of Contents
मागेल त्याला विहीर योजनेचे फायदे
- सरकारची Magel Tyala Vihir Yojana ने शेतकऱ्यांच्या पिकाचा प्रश्न तर मिटेलच सोबत राज्यात पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न मिटेल.
- ज्या शेतकऱ्यांचे पाण्याच्या अभावामुळे पीक वळत होते आणि नुकसान होत होते, ते विहिर असल्यामुळे मात्र होणार नाहीत.
- शेतीचे जर चांगले उत्पादन झाले तर येणाऱ्या पिढीतील तरुण देशील शेती करण्यासाठी प्रेरित होतील.
- पाण्याअभावामुळे छोटे शेतकरी हे शेती कडे ना वळता नोकरी बघत होते. पण पाणी आणि सिंचनाची व्यवस्था झाल्यानंतर त्याचा शेतीकडे बघण्याचं दृष्टिकोन बदलेल.
- सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी अतिशय चांगले, हवे ते बागायती पीक घेऊ शकेल आणि समृद्ध बनेल.
शेतकऱ्यांची निवड
Ahilyadevi Sinchan Vihir Yojana प्रथम शेतकऱ्याने आपल्या ग्रामपंचायत मध्ये वीहिर खोदण्यासाठी अर्ज करावा. त्यानंतर पात्र असलेल्या लाभार्थी शेतकरीची या योजनेअंतर्गत निवड होते. त्याबरोबरच नंतर विहीर खोदण्यासाठी परवानगी देण्यात येते. परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू होते. काम पूर्ण होण्याच्या टप्प्यानुसार अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते.
योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- अर्जदाराचे आधारकार्ड
- राशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- मेल आयडी
- रहिवासी पुरावा
- शेतीचा सात बारा, आठ-अ
- रोजगार हमी योजनांचे कामगारांचे जॉब कार्ड
- अर्जदाराकडे किमान 0.40 हेक्टर शेती
लाभार्थ्यांसाठी अनुदान मर्यादा
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते.
- प्रवर्ग:एससी, एसटी, ओबीसी, आणि ओपन अशा सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
शासन निर्णयाची वैशिष्ट्ये
- Vihir Anudan Yojana GR प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना प्राधान्य.
- भोगवटादार वर्ग 2 च्या शेतकऱ्यांना पात्रता.
- एससी, एसटी, ओबीसी, ओपन प्रवर्गातील शेतकऱ्यांना समाविष्ट.
विहीर अनुदान योजना GR लिंक
योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार:
अनुसूचित जाती, जमाती, भटक्या व विमुक्त जातीतील शेतकरी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, दारिद्र रेषेखालील कुटुंबे, महिला, कर्त्या असलेले कुटुंब, दिव्यांग व्यक्ती करता असलेले कुटुंब, जमीन सुधारण्याच्या लाभासाठी इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी (2.5 एकर पर्यंत जमीन) असणे आवश्यक आहे. या घटकातील सर्वांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
विहीर योजनेसाठी आवश्यक पात्रता:
- शेतकऱ्याकडे सलग एक एकर शेती असणे आवश्यक आहे.
- पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पासून 100 मीटर पर्यंत अंतर असणे आवश्यक आहे.
- दोन विहिरीमध्ये 250 मीटर अंतर असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीय व दारिद्र रेषेखालील कुटुंबासाठी हा नियम नाही.
- सातबारावर यापूर्वी विहिरीची नोंद नसावी.
- याबरोबरच अर्ज शेतकरी हा जॉब कार्डधारक असावा.
- सक्षम प्राधिकरणाने दिलेला जातीचा दाखला असावा.
- नवीन विहीर खोदण्यासाठी कमीत कमी एक एकर जमीन असावी.
- लाभार्थी शेतकऱ्याची जमीन विहीरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी; यासाठी शाखा अभियंता किंवा उप अभियंता भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी करून अहवाल तयार करतील.
- यापूर्वी शासकीय योजनांमधून विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे किंवा भात खाचरासोबत तयार होणाऱ्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थ्याकडे किमान 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे; त्याहून कमी क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यास विहीर मंजूर होणार नाही.
- तथापि, दोन किंवा तीन लाभार्थ्यांनी सलग जमीन असल्यास, सामुदायिक विहीर मिळवण्यासाठी ते पात्र ठरतील.”
- पाण्याच्या वापर आणि हिस्सेवारीसाठी संबंधित शेतकऱ्यांनी रु. 100 च्या स्टॅम्प पेपरवर करार करणे आवश्यक आहे.”
- विहिरीशिवाय इतर लाभ घेण्यासाठी कमीत कमी २० गुंठे जमीन असावी.
- वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आतील असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया :
सदर योजनेसाठी तुम्हाला दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अर्ज करता येणार आहे.
- ग्रामपंचायत मध्ये जाऊन वीहिर खोदण्यासाठी अर्ज केल्यानंतर, पात्र असलेल्या लाभार्थी ठरलेल्या शेतकऱ्यांची, या योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल.
- त्याबरोबरच नंतर विहीर खोदण्यासाठी परवानगी देण्यात येते. परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू होते.
- काम पूर्ण होण्याच्या टप्प्यानुसार अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते.